भास्करराव विठोजीराव जाधव

भास्करराव विठोजीराव जाधव

जन्म दिनांक १७ जून १८६७ रोजी नागाव, जिल्हा रायगड या ठिकाणी झाला होता.

त्यांच्या वडिलांचे नाव विठोजीराव तर आईंचे नाव लक्ष्मीबाई असे होते.

  • भास्करराव विठोजीराव जाधव यांचे घराणे रायगडाच्या परिसरातील बिरवाडीचे
  • रा.गो. भांडारकर हे त्यांचे सहाध्यायी होते.
  • मॅट्रिकच्या परीक्षेत ते मुंबई इलाख्यात सर्वप्रथम आले होते.
  • महात्मा फुले, आय्यवारू स्वामी , प्रा. केळूसकर ही त्यांची दैवते बनली . अशाप्रकारे ते सत्यशोधक समाजाचे खंदे पुरस्कर्ते बनले.
  • पुण्यातील ‘डेक्कन मराठा एज्युकेशन सोसायटी’चे अध्वर्यू अ‍ॅड. गंगाराम भाऊ म्हस्के यांनी त्यांचे नाव शाहू महाराजांना सुचवले.
  • दुर्मिळ गुणांमुळे त्यांनी भास्कररावांना आग्रहाने करवीर संस्थानात नेमून घेतले.
  • 1895 ते 1921 या काळात भास्कररावांनी मुख्य महसूल अधिकारी , जिल्हा व सत्र न्यायाधीश, असिस्टंट प्लेग व फॅमिन कमिशनर, 1901 च्या शिरोगणतीचे उपाधीक्षक इ. अनेक महत्त्वाची पदे भूषवली
  • बहुजन समाजाचे शिक्षण, जातीभेद निवारण, अस्पृश्यता निर्मुलन, ब्राह्मणेतरांचे राजकारण या बाबतीत त्यांचे व शाहू महाराजांचे विचार समान होते
  • शाहू महाराजांचा प्रगाढ विश्वास असल्यामुळे कोल्हापूर नगरपालिकेच्या कारभाराची सर्व सूत्रे तब्बल 14 वर्षे भास्कररावांच्या हाती राहिली
  • करवीरची जनता त्यांचा ‘कोल्हापूरचे दुसरे शिल्पकार’ असा त्यांचा अभिमानाने उल्लेख करते.
  • त्यांना प्रति शाहू महाराज असेही म्हटले जाते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*