WHO कडून भारतातील कफ सिरफबाबत धोक्याचा इशारा | तुम्ही धोकादायक कफ सिरफ वापरत नाही ना?

कोणतेही औषधं घेताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असं आपण अनेकदा ऐकतो. मात्र आता त्याहूनही एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे भारतात वापरलं जाणारं एक कोफ सिरपच धोकादायक असल्याचं थेट जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलं आहे. त्यामुळे सर्दी खोकला झाल्यावर तुम्ही हे जागतिक आरोग्य संघटनेने धोकादायक ठरवलेलं कफ सिरप तर घेत नाही ना जाणून घ्या कोणत? आहे हे कप सिरफ (Cold Out Cough Syrup )

भारतामध्ये तयार झालेलं हे कफ सिरप पॅरासिटामॉल आणि क्लोरपेनिरामाइनच्या मिश्रणातून बनवलेले हे कफ सिरप आहे. त्याचं नाव ‘कोल्ड आऊट’ असं आहे. हे कप सिरप धोकादायक आहे. हे सिरप कमी दर्जाचं आहे. कारण ते जागतिक आरोग्य संघटनेने ठरवलेल्या मानकांवर तयार करण्यात आलेले नाही. त्यामुळे त्याची सुरक्षितता आणि गुणवत्ता वेगळी आहे. असं सांगण्यात येत आहे.

भारतामध्ये तयार झालेलं हे कफ सिरप पॅरासिटामॉल आणि क्लोरपेनिरामाइनच्या मिश्रणातून बनवलेले हे कफ सिरप आहे. त्याचं नाव ‘कोल्ड आऊट’ असं आहे. तर फोर्ट्स इंडिया लॅबोरेटरीज प्रायवेट लिमिटेटसाठी डाबीलाईफ फार्मा प्रायवेट लिमिटेड ने तयार केलेलं आहे. या कप सिरपमध्ये एथिविन ग्लायकोल आणि डायथिलीन ग्लायकोल या दोन्ही घटकांच मात्रा निश्चित मर्यादेपेक्षा 0.10 टक्के जास्त आहे. यामुळे आरोग्यावर केवळ परिणामच नाही तर मृत्यू देखील होऊ शकतो.

त्यामुळे भारतात तयार झालेल्या या कफ सिरपवर इराकमध्ये बंदी घालण्यात आली आहे. या अगोदर देखील भारतातील कफ सिरपवर इतर देशांमध्ये बंदी घालण्यात आली आहे. त्यात आता ‘कोल्ड आऊट’ कफ सिरपचा देखील समावेश झाला आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*