टर्म इन्शुरन्सचे महत्व आणि तो घेताना काय काळजी घ्यावि (Term Insurance)

इन्शुरन्स आपण ह्या साठीच घेतो की भविष्यातल्या संकटा बाबत चिंता न करता जगणे. टर्म इन्शुरन्स हा खऱ्या अर्थाने इन्शुरन्स हा अर्थ सार्थ करतो.

टर्म इन्शुरन्स म्हणजे काय?

टर्म इन्शुरन्स मध्ये ग्राहक प्रीमियम स्वरूपात रक्कम भरतो ज्या बदल्यात त्याला मोठ्या रकमेचे कव्हर( Sum Assured) भेटते. ह्या इन्शुरन्स ची खासियत ही आहे की ‘मोठी sum assured’ मिळते. म्हणजेच विमा धारकाचा मृत्यू झाल्यास मोठी रक्कम मिळते !

Sum Assured किती आणि प्रीमियम किती हे तुमच्या वयानुसार ठरत असते.

जितके वय कमी, तितका प्रीमियम कमी.

उदाहरणार्थ, माझ्या एका नातेवाईकाने १७००० वार्षिक प्रीमियम घेतले ज्याला १ कोटी रुपये कव्हर आहे आणि त्याचे वय ३५ आहे.

Term Insurance घेताना, Annual Premium चा विचार करण्यापेक्षा; रोजचा प्रीमियम मोजावे!

जसे, माझ्या नातेवाईकाने विचार केला असावा, वर्षाचे १७०००₹ म्हणजे रोजचे ४७₹. रोजचे ५०₹ आपण कुठेही खर्च करतो त्यामध्ये आपल्याला १ कोटींचा Coverage मिळतो व मनाला भविष्याची चिंता होत नाही.

तुम्ही विचार करू शकता, की जर तुम्हाला काही झाले तर तुमच्या परिवाराला ती रक्कम वाईट प्रसंगातून निघण्यास सहाय्य करेल. शिवाय, त्या पैशांमध्ये तुमच्या मागे तुमची पत्नी/आई/वडील हे त्यांचे खर्च, मुलांचे शिक्षण, लग्न, रिटायरमेंट चे पैसे बाजूला काढू शकता.

एक लक्षात घ्या, टर्म इन्शुरन्स मध्ये विमाधारकला काहीही न झाल्यास ; प्रीमियम परत मिळत नाही.

रायडर नावाचा एक Extra Plan; टर्म प्लॅन सोबत विकला जातो, जो की आपल्यावर बंधनकारक नसतो.
त्यात Accident Rider, Critical Illness Rider आणि अजून बरेच प्रकार असतात.

Accident मध्ये तेव्हाच पैसे मिळतात जेव्हा तुम्ही Term Insurance सोबत Accident Rider सुद्धा विकत घेता; ज्यामुळे प्रीमियम ही वाढतो.

Accident Rider म्हणजे Accident मध्ये मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास तुमचा जगण्याचा खर्च ह्या पैशांतून निघतो.

अशाच प्रकारे Critical illness rider हा सुद्धा तुम्ही विकत घेऊ शकता; ज्यात विमा कंपनी ने दिलेल्या ‘ लिस्ट ‘ मधून आजार झाल्यास ,कंपनी ठराविक रक्कम देते.

पण रायडर घेताना तुम्ही सर्व पडताळणी नीट केली पाहिजे. कारण critical illness मध्ये हॉस्पिटल बिल वर आधारित पैसे मिळत नाही.

Critical Illness चा “Non indemnity claim ” असतो ; म्हणजे असं की: तुमचा खर्च कितीही असला तरी, Insurance Company fixed amount देते.
समजा,
२ जणांनी क्लेम केला. दोघांचा Sum Assured ५ लाखाचा होता. पहिल्याच Hospital खर्च आला २ लाख आणि दुसऱ्याचा ८ लाख कंपनी, दोघांना ५ लाख देणार.

Critical illness मुळे तुमचा प्रीमियम ही वाढतो. पण तुम्हाला तशी गरज असल्यासच घ्या. नाहीतर चांगला Health Insurance तुमची गरज भागवत असल्यास critical illness बद्दल विचार करा की खरंच आपल्याला तशी गरज पडेल का?

ह्यात अजून एक ट्विस्ट असा आहे की काही कंपन्यांनी टर्म इन्शुरन्स चा प्रीमियम refundable स्वरूपात केला आहे पण ह्याचा प्रीमियम २-३ पट महाग असते.

जर तुम्ही वय लपवले किंवा रोगांची चुकीची माहिती दिली किंवा इतर काही चूक केली तर claim reject होऊ शकतात. म्हणून विमा घेतानाच नीट paper वरती प्रत्येक बिंदू वर अभ्यास करा.

हप्ता पूर्ण भरणार असाल तरच विमा घ्या. नाहीतर अर्धवट भरल्यास पॉलिसी lapse होऊन नुकसान होते.

टर्म प्लॅन घेतांना सल्लागाराला खूप सारे प्रश्न विचारा. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी Terms and Conditions मध्ये आहेत का? ते पाहा.
पोलिसी नंबर, फायदे, फ्रौड झाल्यास ‘Ombudsman ‘ कडे तक्रार करणे, इ. गोष्टी एका कागदावर लिहून आपल्या परिवाराला तो कागद जपून ठवण्यास सांगा!

समझा की विमाधारकाचा मृत्यू झाला आणि इन्शुरन्स कंपनी ने फ्रौड करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही Insurance Ombudsman कडे जाऊन तक्रार नोंदवू शकता !
https://www.policyholder.gov.in/report.aspx
Ombudsman हा third party असतो; जो विमा धारकला न्याय देण्यास मदत करतो.

सगळ्यात महत्वाचे, पोलिसी Documents पूर्ण वाचावे. आपल्याला पॉलिसी “मिळाल्यानंतर १५ दिवस फ्री लूक पिरियड ” असतो ज्यात आपण सर्व पडताळणी करतो.

जर सल्लागारांनी चुकीची माहिती दिली असे वाटत असेल, तर पॉलिसी कॅन्सल करा आणि त्याची एक प्रत तुमच्याकडे ही ठेवा.

आता कव्हर किती असावे?

तुमच्या वार्षिक कमाई च्या १०/१५ पट असावे. जेवढे कव्हर वाढणार, तेवढा प्रीमियम वाढणार.

किती वयापर्यंत घ्यावे ?

जोपर्यंत तुमचा परिवार तुमच्या कमाई वर अवलंबून असेल तोपर्यंत. जसे की ६०/६५ वयापर्यंत घ्या.
जास्त प्रीमियम भरू शकत असाल तर ७५/८० पर्यंत घ्या.

टर्म इन्शुरन्स कोणी घेऊ नये ?

  1. ज्याला आधीपासूनच मोठे आजार आहेत , त्यांचे claim settle होण्यास अवघड असतात किंवा reject होतात.
  2. मद्यपान करणारी, अमली पदार्थ सेवन करणाऱ्या लोकांना देखील हा प्लॅन मिळणे अवघड असते.
  3. जे आर्थिक स्वतंत्र आहेत किंवा ज्यांनी इतकी संपत्ती कमवली आहे की त्यांचा उद्या मृत्यू झाल्यास ती संपत्ती पूर्ण परिवाराच्या गरजा पूर्ण करू शकते ; अशांनी विचारपूर्वक घ्यावा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*